नवरी मुलगी खेड्यातली असू द्या किंवा शहरातली असू द्या . लग्नानंतर काय होणार आहे? हे तिला माहितीच असते.... अर्थात हनिमून ....प्रत्येक मुलीला माहिती तिच्या नातेवाईकांकडून किंवा टीव्ही मधल्या सिरीयल... चित्रपटांमधून तिला मिळालेली असते आणि त्यानुसार ती आपल्या स्वतःच्या हनिमूनचे स्वप्न रंगवत असते. जर ते स्वप्न पूर्ण करण्यामध्ये नवरदेव व अयशस्वी ठरला तर मात्र संसारामध्ये रूळणे तिला आणि त्याला दोघांनाही फार कठीण जाते.....
ही कथा अगदी याच संबंधांवर आधारित आहे. एका मुलीचे स्वप्न आणि ते स्वप्न पूर्ण करत असताना नवरदेव मुलाची झालेली धावपळ.... मी या कथेमधून मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे .कधी कधी आपण लग्नच कशाला केले ?असे नवरदेव आणि नवरी दोघांना वाटायला लागू लागते..... तर कधी कधी बरे झाले... आपण याच्याशीच किंवा तिच्याशीच लग्न केले.
या कथेतील पात्रांचा कोणत्याही व्यक्तीशी किंवा घटनेशी संबंध नाही ...... आला तर तो निव्वळ योगायोग समजावा. ही कथा पूर्णपणे काल्पनिक आहे.
गायत्री आणि अमोल यांचे लग्न होऊन साधारण पाच दिवस होऊन गेलेले होते. पहिला दिवस तर लग्नात.... दुसरा दिवस सत्यनारायण ...तिसरा दिवस कुलदेवतेची आराधना ....चौथा दिवस आलेल्या बहिणींना आणि जावयांना निरोप देण्याचा.... आणि पाचवा दिवस होता.... घरातील संपलेला किराणा भरण्याचा.
अमोलने फक्त पंधरा दिवसांची सुट्टी घेतलेली होती त्यानंतर मात्र त्याला आपल्या नोकरीच्या ठिकाणी जावे लागणार होते. तो एका आश्रम शाळेमध्ये शिक्षकाची नोकरी करत होता ...त्यामुळे त्याला तिथे जाऊन राहणे भाग होते. आश्रमशाळा ही नेहमी एका खेड्या गावांमध्ये असते. अशा गावामध्ये नव्या नवरीला नेणे शक्य नव्हते त्यामुळे त्याला काही दिवसांसाठी ये-जा करावी लागणार होती.
लग्नाला सहा दिवस होऊन गेलेले होते तरीसुद्धा अमोल ने अजून गायत्रीला चांगली बघितली सुद्धा नव्हते कारण घरातील गोंधळ घरातील सर्वांनाच मान देणे आणि मोठ्या बहिणी असल्यामुळे घरामध्ये बहिणी त्यांचे मुलं जावई असताना बायकोला घेऊन त्याने बाहेर जाणं शोभत सुद्धा नव्हतं आता काय लग्न झालेला आहे बायको आपल्याजवळच राहणार आहे मग आई कशाला करायची असे त्याच्या मनात आले आणि निवांत वेळ घेऊया काही कुठे आपल्याला जायचे नाही असे मनातल्या मनात विचार करत होता तरीसुद्धा दुपारी जेवण झाल्यानंतर साधारण बारा वाजता आई नेहमीप्रमाणे दारी ओट्यावर बसायची अशा वेळेस गायत्री घरामध्ये एकटी आपल्या खोलीमध्ये दिसायला जायची हीच वेळ होती तिला एकट्यामध्ये गाठायची आणि तो सुद्धा आईला म्हणाला आई तू ओट्यावर बस मी थकला आहे हे जरा आराम करतो आईला समजले होते आई अलगद हसली आणि काही न बोलता तोंडाला पदर लावत आपले हसू लपवत बाहेर निघून गेली दरवाजा लावून घ्या आठवणीने मांजर येते असे मात्र आठवणीने तिने सांगितले तेही हसतच आई कधी मला असं काही सांगत नाही आज कशी सांगत आहे आणि ते पण हसत विशेष वाटले.
तो पळतच आपल्या स्वतःच्या म्हणजेच गायत्री ज्या रूममध्ये झोपायला गेली होती.... आराम करायला गेली होती.... तेथे पळत गेला ...बघतो तर गायत्री आपल्या खोलीमध्ये ...कॉटवर झोपलेली परंतु आपल्या आई-वडिलांची आठवण येत असल्यामुळे ....रडत होती.
रोमँटिक झालेला अमोल अचानक तिचे अश्रू बघितले आणि रोमान्स कधीच त्याचा बाहेर निघून गेला.
तो तिला लहान बाळाला समजावतो तशा पद्धतीने समजावू लागला," ठीक आहे ...रडू नको ...उद्या मी तुला तुझ्या आई-वडिलांच्या घरी घेऊन जातो... भेट घेऊन घे.... वाटले तर तू तिथे एक-दोन दिवस राहू सुद्धा शकते "असे तो तिला सांगू लागला.... सांगत असताना ...तो तिच्या केसांवरून, गालांवरून, पूर्ण शरीरावरून हात फिरवू लागला.
जवळजवळ वयाची 28 वर्ष त्याने कधीही कोणत्याही मुलीला/ स्त्रीला कधी हात लावला नव्हता... साहजिक आहे जेव्हा तो गायत्रीला हात लावत होता... तेव्हा त्याच्या भावना उचबंळून आलेल्या होत्या .
लवकरात लवकर हिला आपल्या मिठीत घ्यावी ...असे त्याला वाटत होते ...परंतु ती रडत असताना असे करणे शोभत नाही याचे भान त्याला होते.
थोड्यावेळाने गायत्रीची रडणे थांबले आणि ती अमोलकडे बघू लागली त्याने तिला विचारले," काय झालं ?...अशी काय बघत आहे माझ्याकडे?"
"काही नाही सहज... तुम्हाला एक विचारू... लग्नानंतर नेहमी मुलगीच सासरी का जाते?... जे काही दुःख भोगायचे असते ते मुलीच्या नशिबात का असते?... मुलं नाही करू शकत का असं?" गायत्री अगदी निरागसपणे प्रश्न विचारत होती .
अमोल लग्नाला सहा दिवस झालेले ...ही वेळ खरंच नव्हती असे प्रश्न विचारायचे.... परंतु काय करणार?..... आपली बायको.... नवरा बायकोच्या संबंध ....खास करून शारीरिक संबंध याबाबतीमध्ये तिला काहीच माहिती नाही .... आपली बायको अज्ञानी आहे आणि आता आपल्यालाच तिला ज्ञानी बनवावे लागेल असा तो विचार करत होता.
"मी काहीतरी विचारले आहे... निदान त्याचे तर उत्तर द्या... असे शांत बसून कसे चालणार ... माझ्या प्रश्नांची उत्तरे तुम्ही द्यायलाच हवी" गायत्री म्हणाली.
"प्रश्नांची उत्तरे देणे आणि प्रश्न विचारणे , प्रश्नांची उत्तरांचा उलगडा करणे... स्पष्टीकरण करणे हा माझा बिझनेसच आहे. बाई !जसा शिक्षक मी झालो.... त्या दिवसापासून माझ्यामागे हे सर्व लागले आहे. मला वाटले होते... निदान माझी बायको तरी हुशार निघेल आणि चार गोष्टी तीच मला शिकवेल परंतु तसे झाले नाही म्हणून मी शांत बसलो" असं तो हसतच म्हणाला.
" मी हुशारच आहे परंतु मी बघत आहे ..... तुम्ही हुशार आहात की नाही . आपल्या साडीच्या पदराला उगाचच बरोबर करत गायत्री म्हणाली.
तिची ती हालचाल बघितल्यानंतर तो तिला म्हणाला," तुला साडी घालायची नसेल तर तू काढून ठेवू शकते".
"काही पण काय बोलताय ....साडी काढून ठेवू आणि मग घालू काय ?....माझ्याकडे गाऊन सुद्धा नाही आणि ड्रेस सुद्धा नाही.... मला वाटले होते ...तुमच्या घरी असेल "गायत्री म्हणाली.
"माझ्या घरी आहे ना !....माझी लुंगी ....घालते ?.....नाहीतर बरमोडा..." तो तिला आपल्या बरमूडा दाखवू लागला.
"नको साडीच बरी आहे" गायत्री म्हणाली.
"तुला गरम होत असेल तर काढून टाक ना! तो म्हणाला आणि म्हणत असताना त्यांनी तिच्या पदराची पिन काढून टाकली. तिचा पदर खाली पडला.
अमोल पहिल्यांदा एखाद्या स्त्रीला तिच्या उघड्या छातीला पाहिले होते. तो एकटक पाहू लागला.
गायत्रीने चटकन आपल्या दोघी हात आपल्या ब्लाऊज वर ठेवत आपली उघडी छाती झाकत पदर पटकन ताणला आणि आपल्या डोक्यावरून घेत म्हणाली," फारच घाई आहे तुम्हाला...".
"तुला नाही "असे म्हणत तो तिला आपल्या मिठीमध्ये ओढू लागला. त्याची आणि तिची दोघांचीही हृदयाची धडकन अगदी जोर जोरात वेगाने धडधड करत होती .दोघेही एकमेकांमध्ये विलीन होण्यासाठी आतुर झाले होते.
त्याने तिचा चेहरा आपल्या दोघी हातांनी खसकन आपल्या हातामध्ये घेतला आणि तिच्या चेहऱ्याला आपल्या चेहऱ्याजवळ आणत तिच्या ओठांवरून आपले दोघेही हात फिरवू लागला किती लुसलुशीत आहे. तुझी त्वचा, तुझे डोळे ,तुझे केस असे म्हणत असताना तो तिच्या चेहऱ्यावरून ,तिच्या गालांवरून ,तिच्या केसांवरून तिचा गळाला हात लावू लागला.
"प्लीज .... मला कसेतरी होत आहे.... सोडा ना !....आई बाहेरच बसलेल्या आहे..... मला लाज वाटते..... ती त्याचा हात खाली झटकत म्हणाली.
त्याने आश्चर्याने तिच्याकडे बघितले आणि म्हणाला," अगं मी तुला पकडलंच नाही आहे मी फक्त हात लावतोय तेवढ्या काही होत आहे आणि जर मी खरोखर...... एवढं बोलण्याच्या आतच तिने तिचा हात त्याच्या ओठांवर ठेवला आणि त्याला गप्प केले.
त्याने पटकन तिचा हात धरला किती माऊ लुसलुशीत आहे तिची बोट लांब आणि हातावर मेहंदी लांब सुंदर नको या मेहंदीमध्ये माझे नाव लिहिले आहे का?... असे तो तिला विचारत तिची मेहंदी बघू लागला.
" बाप रे! ही किती बारीक.... मेहंदी काढली आहे... मेंदी काढत असताना तुला खूप त्रास झाला असेल ना?... खूप वेळ लागला असेल.... काय गरज होती?.... एवढं सगळं काही करण्याची.... साधी... छोटीशी काढली असती तरी चालली असती..." असे तो म्हणत होता.
" जो त्रास झाला ...तो मला झाला. तुम्हाला थोडीच झाला ...आणि ही मेहंदी मी तुमच्यासाठी काढली नाही.... ही मेहंदी मी माझ्यासाठी काढली आहे .मला आवडते ...."असे म्हणत ती त्याला दाखवू लागली..." बघा किती काढली आहे... किती... येथून तर हे इतपर्यंत आणि असे करत असताना तिने हळूच पुन्हा आपला हात त्याच्या हातात देतात त्याला वर दंडापर्यंत दाखवू लागली.
तिच्या वागण्या बोलण्यामध्ये निरागसता होती परंतु त्याच्या मात्र नव्हती.
त्याने तिच्या हातावरून आपला हात फिरवत असताना आता हळूहळू तो तिचे हात दाबू लागला आणि दाबत दाबत तू तिच्या दंडापर्यंत आपला हात घेऊन गेला .
हळूहळू त्याने आपले हात तिच्या दोन्हीही खांद्यांवर ठेवले आणि हळूहळू तो तिच्या खांद्यांना दाबू लागला. तिने डोळे गच्च बंद केले .
खांद्यांवरचा हात त्याने हळूच तिच्या उघड्या कमरेवर ठेवला.
तिचे गरम पोट तिची अतिशय नरम कातडी... त्या पोटावरून हळूहळू तो हात फिरवू लागला. त्याने तिला अलगद उचलली आणि आपल्या मांडीवर ठेवली . तिच्या पोटावरून हात फिरवत असताना हळूहळू त्याने आपले हात तिच्या दोन्हीही स्तनावर ठेवले .....तेवढ्यात आई जोरात आवाज देत म्हणाली" गायत्री
..... तुझे बाबा आले ग!.... बाहेर ये".
गायत्रीने स्वतःला त्याच्या मिठीतून सोडवले आणि तशीच ती बाहेर पळत गेली.
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा