pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

दीर्घ कथामालिका लिहिताना (६० पेक्षा जास्त भाग) कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी?

16 नोव्हेंबर 2022

प्रिय लेखक,

कसे आहात?

प्रतिलिपिमध्ये लेखन करिअर घडवू इच्छिणाऱ्या आणि लेखनातून मानधन कमवू इच्छिणाऱ्या सर्व लेखकांनी खालील मजकूर काळजीपूर्वक वाचावा.

तुम्हाला माहिती आहे की, प्रतिलिपि अनेक लेखन स्पर्धा आयोजित करत असते. जिथे लेखकांना दीर्घ कथामालिका लिहायची असते. कथामालिकेत किमान ६० भाग असावेत, असा स्पर्धेचा एक नियम असतो.  पण मग ६० भागांची कथामालिका का? असा प्रश्न बऱ्याच लेखकांना पडू शकतो. या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न आम्ही इथे करत आहोत

एक उत्तम, दीर्घ कथामालिका लिहिण्याचे अनेक फायदे आहेत.

  • दीर्घ कथामालिकांना जास्त वाचकसंख्या आणि त्या लेखकांना जास्त अनुयायी मिळतात

  • वाचकांना दीर्घ कथामालिका आवडतात आणि त्या कथामालिका जास्तीत जास्त वाचकांपर्यंत पोहचतात

  • जास्त भाग असले की, त्या भागांना मिळणाऱ्या स्टिकर्सची संख्या सुद्धा वाढते

  • दीर्घ कथामालिकेमुळे जास्त सुपरफॅन सुद्धा लेखकांना मिळतात

  • दीर्घ कथामालिका प्रीमियम विभागात समाविष्ट केल्या जातात, प्रतिलिपि प्रीमियम टीम अशा दीर्घ कथामालिकांचा शोध नेहमी घेत असते

  • प्रीमियम विभागात असलेल्या कथामालिकांच्या लेखकांना दरमहा मानधन मिळते

  • दीर्घ कथामालिका प्रतिलिपिवरील होमपेज म्हणजेच पहिल्या पानावर दिसतात

  • दीर्घ कथामालिकांचे रूपांतर ऑडिओ कथा किंवा कॉमिक्स किंवा युट्युब फिल्म मध्ये होते

  • प्रतिलिपि आयपी टीम अशा लोकप्रिय दीर्घ कथामालिकांचे कॉपीराईट्स विकत घेते, त्यातून लेखकांना चांगले मानधन मिळते

  • आणि आणखी बरेच काही!! 

किमान ६० भागांची कथामालिका लिहून तुम्ही लोकप्रिय होऊ शकता, तर आजच लिहायला सुरुवात करा. तुम्हाला काही अडचण येत असेल, तर प्रतिलिपि टीम नक्कीच मदत करेल. पण त्यासाठी तुम्हाला नियमित लेखन करणे गरजेचे आहे.

६० भागांची कथामालिका कशी लिहावी? याबद्दल काही महत्त्वाची माहिती आम्ही इथे देत आहोत

 

दीर्घ कथामालिकेचे लेखन करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी

  1. असे कथानक निवडता येईल जेथे तुम्हाला प्रत्येक पात्राची एक कथा सांगता येईल, त्यातून अनेक पात्र एकत्र करून लेखन फुलवता येईल, पण लेखन कंटाळवाणे होणार नाही याची सुद्धा काळजी घ्यावी

  1. कथेतील सबप्लॉट्स अतिशय चांगल्या प्रकारे लिहिता येईल. अनेक लेखक याकडे दुर्लक्ष करतात. 60/80/100+ पेक्षा जास्त भाग लिहिताना त्यात छोटी छोटी कथानके लिहिणे सुद्धा गरजेचे आहे. प्रत्येक पात्राची एक कथा असते, ती कथा सुद्धा वाचकांना कळाली तर वाचकांना असे पात्र जवळचे वाटते

  1. एखाद्या पात्राच्या भूतकाळात कोणत्या गोष्टी घडल्या? त्याचा या पात्रावर काय परिणाम झाला? आता हे पात्र कसे वागते? आणि पुढे महत्वाच्या क्षणी हे पात्र कसे वागेल? याचा इतर पात्रांवर कसा परिमाण होईल? अशा सर्व गोष्टींचा विचार करणे आवश्यक आहे

  1. तुमच्या उप-पात्रांच्या आसपास समांतर कथानक सुद्धा फुलवू शकता. कथेतील उप पात्रांवर सुद्धा लेखन करावे, त्यांचा संबंध मुख्य कथानकाशी कसा आहे? हे सुद्धा सांगणे गरजेचे आहे. मुख्य पात्र त्यांच्या बद्दल काय विचार करतात? याबद्दल सुद्धा तुम्ही लेखन करू शकता.

  1. तुमच्या जुन्या कथामालिकेतील वाचकांचे आवडते पात्र सुद्धा, या नवीन कथामालिकेत तुम्ही समाविष्ट करू शकता

  2. वाचकांना ‘वेगळ्या शैलीतील’ कथानक अधिक भावते. उदाहरणार्थ, प्रेमकथा, रहस्य, भय ही शैली वाचकांना नेहमीच आवडते. तुम्ही या सर्व शैलीत लेखन करण्याचा प्रयत्न केला तर वाचकांना सुद्धा नवीन काहीतरी वाचल्याचं समाधान नक्कीच मिळेल

  3. एका कथेत, अनेक कथा सांगण्याचा प्रयत्न करावा. तुमच्या कथानकाला वेगळेपण देण्यासाठी पुनर्जन्म, टाईम ट्रॅव्हल, इतिहास, पुराण किंवा समांतर विश्व यासारख्या कल्पना घेऊन तुम्ही लेखन करू शकता. यामुळे कथामालिका सुद्धा वेगळी होती, तुम्हाला ही नवीन काही लिहिण्याचा आनंद मिळतो.

  1. एक अप्रतिम, साजेसं कव्हर इमेज आणि वेगळं शीर्षक सुद्धा वाचकांच्या मनात उत्सुकता निर्माण करते. प्रतिलिपिवर समान शीर्षक असलेल्या खूप कथामालिका आहेत, त्यामुळे वाचकांचा गोंधळ होतो. म्हणून वेगळं शीर्षक निवडावे. शीर्षक बघूनच वाचकांच्या मनात कथामालिका कशा बद्दल असेल? याबद्दल चित्र तयार होऊ लागतं. शीर्षक जर वाचकांना चांगलं वाटलं तर ते कथामालिका वाचतात 

वेळेचे नियोजन कसे करावे?

नियमित भाग प्रकाशित करणे गरजेचे आहे. यामुळे वाचकांना सुद्धा जास्त वेळ वाट बघावी लागत नाही, पण हे वेळेचे नियोजन कसे करावे?

1. लेखन हे कौशल्य आहे आणि दररोज लेखन केल्यावर हे लेखन कौशल्य विकसित होते, त्यामुळे नियमित लेखन करावे. तुमच्या दैनंदिन जीवनातील एक ठरविक वेळ फक्त लेखनासाठी द्यावा. सुट्टीच्या दिवशी तुम्ही जास्त वेळ लेखनासाठी देऊ शकता. त्यामुळे नियमित लेखनाची सवय लागेलच पण लेखन कौशल्य विकसित सुद्धा होईल

2. तुम्ही नियमित लेखन केले तर एका महिन्यात ३० भागांची उत्तम कथामालिका लिहू शकता आणि लोकप्रिय, प्रसिद्ध लेखक होऊ शकता

3. तुम्ही जर वेगवेगळ्या कथामालिका लिहीत असाल, तर त्यानुसार वेळापत्रक करावे, वाचकांना या बद्दल माहिती दयावी जेणेकरून वाचकांना सुद्धा वाट बघावी लागणार नाही.

4. एक उत्तम दीर्घ कथामालिका तुम्हाला लोकप्रिय बनवू शकते. त्यामुळे तुम्ही नियमित, दरमहा मानधन सुद्धा कमावू शकता, तर ही संधी सोडू नका, नियमित लेखन करा आणि किमान ६०/८०/१०० भागांची कथामालिका लिहिण्याचा प्रयत्न करावा

 

वाचकच सर्वात मोठे परीक्षक असतात

1.दीर्घ कथामालिका लिहिणे अवघड आहे, पण यामध्ये वाचक तुम्हाला मदत करू शकतात, कथामालिकेच्या प्रत्येक भागावरील प्रतिक्रिया वाचाव्यात, वाचकांना नवीन भाग वाचून काय वाटले? त्यांच्या अपेक्षा काय आहेत? तुम्हाला स्वतःला काय लेखन करायला आवडते? या सर्व गोष्टींची सांगड घालूनच तुम्ही तुमचे लेखन अधिक दर्जेदार करू शकता

2. वाचकच तुमचे योग्य मार्गदर्शन करतात, त्यामुळे त्यांनी काही सांगितले, फीडबॅक दिला तर त्या गोष्टी समजून घ्या, त्यांच्याशी चर्चा करा आणि त्यानुसार तुमच्या लेखनात योग्य ते बदल करा

प्रतिलिपिवरील लेखक लोकप्रिय व्हावेत, त्यांनी मानधन कमवावे यासाठी प्रतिलिपि टीम नियमित प्रयत्न करत आहे, ही लेखन स्पर्धा अवघड वाटत असली तरी, हे आव्हान स्वीकारून तुम्ही एक उत्तम कथामालिका लिहू शकता असा आम्हाला विश्वास आहे. त्यामुळे आजच किमान ६०/80/100 भागांची कथामालिका लिहायला सुरुवात करावी


सुपर लेखक अवॉर्ड्स (पर्व ४) या लेखन स्पर्धेत सहभागी व्हा

https://marathi.pratilipi.com/event/dx9d0rvfwk

 

एक अनोखी प्रेमकथा (पर्व २) या लेखन स्पर्धेत आजच सहभागी व्हा

https://marathi.pratilipi.com/event/he9vyxv8rn

 

फॅन फिक्शन या लेखन स्पर्धेत सहभागी होऊ शकता

https://marathi.pratilipi.com/event/ziy1fvv4zl


तुम्हाला काही प्रश्न असतील किंवा तुम्हाला नवीन काही सुचवायचे असेल, 
तर कृपया या
[email protected] ई-मेल आयडी वर संपर्क करावा

 

कळावे, 
टीम प्रतिलिपि