आपण सारेचजण ज्याची आतुरतेने वाट पाहत होतो, त्या दिल दोस्ती यारी स्पर्धेत सहभागी कथांचा निकाल आज आपल्या हाती देताना आम्हाला खूपच आनंद होत आहे.
आपण येथे
क्लिक करून स्पर्धेचा निकाल पाहू शकता:
कवितांचा निकाल उद्या याच पानावर जाहीर केला जाईल.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
महाराष्ट्रातील निवडणूका आणि दिवाळीची धांदल हे सर्व लक्षात घेता खास लेखकांच्या आग्रहास्तव या स्पर्धेची अंतिम मुदत वाढवण्यात येत आहे.
या स्पर्धेच्या सबमिशनची मुदत आता संपलेली आहे.
या स्पर्धेत सहभागी कथांचा निकाल १८ डिसेंबर रोजी तर कवितांचा निकाल १९ डिसेंबर रोजी परीक्षकांच्यातर्फे लावण्यात येईल.
शाळांच्या अनुपलब्धतेमुळे कथेवर आधारित चित्रकला स्पर्धेची योजना तूर्तास रद्द करण्यात आलेली आहे. आपल्याला झालेल्या गैरसोयीबाबत आम्ही दिलगीर आहोत.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
बाल साहित्य असे म्हणताच मराठीमध्ये अगदी हाताच्या बोटावर मोजावी इतकीच नावे डोळ्यासमोर येतात. पण घराघरात आजी-आजोबा आपल्या चिमुकल्यांना सांगण्यासाठी स्वतःच कितीतरी गोष्टी रचत असतातच. तर कधी गाणी, बडबडगीते गात असतात. तुमच्याकडेही आहेत अशा फक्त तुमच्या चिमुकल्यांना सांगितलेल्या गोष्टी , गायलेली गाणी ? सांगितलेली, ऐकलेली पण कुणीही न वाचलेली ?
तर मग समस्त चिमुकल्यांसाठी घ्या ती लेखणी हाती आणि स्विकारा हे आव्हान बालरंगचे !
ज्यात भाग घेऊन तुमच्या साहित्याला मिळेल एक नवा बाल चित्रकार !!! आणि अनेक आकर्षक संधी !!
प्रतिलिपि चिमुकल्यांसाठी "बालरंग" च्या माध्यमातून एक अगदी आगळीवेगळी योजना घेऊन आलेली आहे. मुळातच रंगाचे वेड असलेल्या या बालकांना वाचनाची प्रेरणा देण्याचा हा एक अनोखा प्रयत्न !
बालरंग हे ३१ दिवसांचे लेखन आव्हान आहे, ज्यामध्ये आपण लहान मुलांसाठी गोष्टी किंवा कविता लिहू शकता.
वयोगट :
इयत्ता ५ वी ते इयत्ता ७ वी
इयत्ता ८ वी ते इयत्ता १० वी
१४ नोव्हेंबर बालदिनादिवशी बालरंग स्पर्धेमधील निवडक बालसाहित्य वाचकांसाठी खुले केले जाईल. वाचनासाठी त्यांना एक महिन्याचा कालावधी देण्यात येईल. त्यांनतर यावर चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात येईल.
यानंतर हे साहित्य वाचून बालकांना त्यांना आवडलेल्या कथेच्या किंवा कवितेच्या मुखपृष्ठासाठी चित्र काढण्याचे आव्हान देण्यात येणार आहे.
ज्या कथेला आणि ज्या कवितेला बालकांची सर्वाधिक पसंती मिळेल, ती कथा आणि ती कविता या स्पर्धेची विजेती कथा आणि विजेती कविता म्हणून जाहीर करण्यात येईल.
- वरील चित्रकला स्पर्धेची योजना शाळांच्या अनुपलब्धतेमुळे तूर्तास तरी रद्द करण्यात आलेली आहे. निकाल परीक्षकांच्या मतानुसार १८ डिसेंबर रोजी लावण्यात येईल. त्याचदिवशी स्पर्धेमधील निवडक बालसाहित्य वाचकांसाठी होमपेजवर खुले केले जाईल.
पारितोषिके:
प्रथम क्रमांक:
प्रथम पारितोषिक: २५००/- (अडीच हजार रुपये)
द्वितीय पारितोषिक: १५००/- (दीड हजार रुपये)
तृतीय पारितोषिक: १००० /- (एक हजार रुपये)
पहिल्या तीन विजेत्यांना प्रतिलिपितर्फे मानचिन्ह आणि रोख रक्कम देण्यात येईल.
टॉप ५० विजेत्या कथा आणि कवितांना मिळेल डिजिटल सर्टिफिकेट !!
टॉप २५ विजेत्या कथा आणि कवितांचे (ऑडिओ) ध्वनिमुद्रण करण्यात येइल !
स्पर्धेचे नियम :
१) स्पर्धेत पाठवलेले साहित्य हे स्व-लिखित असावे. (दुसऱ्या लेखकाच्या साहित्याची कॉपी करणे कायदेशीर गुन्हा आहे.)
२) प्रतिलिपिवर पूर्वप्रकाशित कथा स्पर्धेसाठी ग्राह्य धरली जाणार नाही. तथापि, इतर कोणत्याही माध्यमांवर प्रकाशित असलेली कथा आपण स्पर्धेसाठी नक्कीच सबमिट करू शकता.
तसेच स्पर्धेसाठी नवीन कथा लिहूनही आपण या स्पर्धेत सहभागी होऊ शकता.
३) कथा अथवा कविता यांसाठी कोणतीही शब्दमर्यादा नाही. तथापि चारोळी स्पर्धेमध्ये स्वीकारली जाणार नाही.
४) एक किंवा एकापेक्षा जास्त कितीही कथा आणि कविता प्रकाशित करून या स्पर्धेमध्ये आपण सहभागी होऊ शकता.
५) आपण कथामालिका स्वरूपात कथा लिहिल्यास एकाच शीर्षकाखाली त्या कथेचे सर्व भाग एकत्रित करून संपूर्ण कथा सबमिट करावी.
६) शक्यतो व्याकरणाच्या चुका टाळाव्यात. व्याकरणाच्या जास्त चुका असलेले साहित्य ग्राह्य धरले जाणार नाही.
सहभाग कसा घ्यावा ?
१. बालरंग स्पर्धेची मुदत १० दिवस वाढवण्यात आलेली आहे. अंतिम मुदत वाढवून ती ३ नोव्हेंबर करण्यात आलेली आहे.
२. यावेळी सहभागी होण्यासाठी भाग घ्या हे बटनअसणार नाही.
३. स्पर्धेत भाग घेण्यासाठी थेट आपले साहित्य प्रतिलिपिवर प्रकाशित करायचे आहे.
४. साहित्य प्रकाशित करताना कथा किंवा कविता यापैकी साहित्याचा प्रकार निवडल्यानंतर श्रेणी मध्ये बालसाहित्य या श्रेणीची निवडकरणे अनिवार्य आहे.
इतर श्रेणीची निवड केल्यास ते साहित्य स्पर्धेसाठी ग्राह्य धरले जाणार नाही. तसेच ईमेलवर पाठवलेले साहित्य स्पर्धेसाठी ग्राह्य धरले जाणार नाही.
५. कथेच्या शेवटी वयोगट अवश्य नमूद करावा.
६. २५ ऑक्टोबर रोजी स्पर्धेमध्ये सहभागी साहित्य मुलांना वाचनासाठी प्रतिलिपिच्या होम पेजवर खुले केले जाईल.
स्पर्धेविषयी काही शंका अथवा समस्या आहे ?
मोबाइल क्रमांक : ६३६२३ १५४०७ (11am to 8pm)
आम्ही आपल्या मदतीसाठी सदैव तत्पर आहोत.
लक्षात ठेवा:
सहभागाची अंतिम तारीख : ३ नोव्हेंबर, २०१९
All the best!! चिमुकल्यांना तुमची लेखणी काय काय सांगते, हे तुमच्या कथा-कवितांमधून वाचायला आम्ही उत्सुक आहोत.