!!आज आहे विज्ञान दिवस!! !!आज आहे विज्ञान दिवस!!
!! विज्ञानाने गाठला मानवी विकासाचा कळस!!
!!आला आहे विज्ञान दिवस पण माणसाचा वाढत चालला आहे आळस!!
!! विज्ञानाने केलेली क्रांती पण अध्यात्म शिवाय नाही मन शांती!!
!! विज्ञान आणि वाढवली विकासाची गती पण माणसाची हरवली आज नीती !!
!!विज्ञानाला आहे अनेक दिशा पण मानवी जीवनाची झाली आज नशा !!
!!विज्ञान आहे शाप की वरदान पण मनुष्य झाला विज्ञाना मुळे प्रधान!!
!!विज्ञानामुळे प्रगत झाले शरीर स्वास्थ्य पण माणसाचे हरवले आज मनस्वास्थ!!
!!विज्ञानामुळे प्राप्त झाले वैज्ञानिक ज्ञान पण माणसाचे हरवले अंतर्ज्ञान!!
!!विज्ञानामुळे आला विकासाचा पूर पण माणसातली माणुसकी झाली दूर!!
!!विज्ञानामुळे शहर झाले मोठे पण माणसाचे मन झाले छोटे!! !!विज्ञानामुळे ज्ञान झाले मोठे पण कपडे झाले छोटे!!विज्ञानामुळे झाला भरपूर भौतिक विकास !!पण माणसाची मानसिकता झाली भकास!! ही कविता मी स्वतः केलेली आहे . आपला स्नेहांकित कवी उल्हास सुधीर देशपांडे