मी सौ वैशाली अविनाश वर्तक . मी लेखनात सुरुवात लेख ललित लेख लिहावयाची. मग कविते कडे वळले. सुरुवातीस रोज शुभ सकाळच्या फुलांवर
निसर्गावर चारोळी लिहून शुभ सकाळ ....आनंदात जावो दिन अशा प्रकाराचे शुभ संदेश लिहावयाची. असे मी आम्ही साहित्यिक समूह फेस बूक च्या लिहीता लिहीता
कविता लिहू लागले .विविध साहित्य समूहात दिलेल्या शब्दावर काव्य रचना ओळ काव्य करता करता. साहित्याचे बरेच हाताळू लागले .चाराक्षरी अष्टाक्षरी .सहाक्षरी
सुधाकरी ओवी वगैरे प्रकार शिकले.
मी अखिल भारतीय मराठी संमेलन बडौद्याला व तसेच यवतमाळ ला झालेल्या साहित्य संमेलनात कवि कट्ट्यावर माझी कविता सादरीकरणात माझी कविता निवडण्यात आली .
तसेच बेंगलोर कवी कट्टा च्या मासिकात बरेच दा माझी कविता, लिखाण प्रकाशित झालेले आहे. तसेच सिंगापूर शब्दगंध च्या कविता संग्रहात पण माझ्या कविता प्रकाशित झाल्या आहेत. मराठी च्या विविध साहित्य समूहातून मला जवळ 450 प्रमाणपत्र अगदी प्रोत्साहन पासून सर्वोत्कृष्ट सर्व थरांची प्रमाण पत्र मिळाली आहेत. माझा अतर्मन नावाचा कविता संग्रह पण प्रकाशित झाला आहे.
खरे पहाता मी पोहणारी .गुजरात चे शालेय महाविद्यालयातील जल पटू. वरिष्ठ नागरिक मधून आंतरराष्ट्रीय तरण स्पर्धेत मी मोंनट्यीयर ( कॕनडाला )
पण बॕक मधे रीप्रेझेंट केले आहे .तापी नर्मदेची सुवर्ण पदक मिळवली आहेत.
आता मी अक्षर शब्दात पोहत आहे.