<p><strong>सुनीता सुरेश महाबळ</strong></p>
<p> <strong> जन्म दिवस : ५ / ११ / १९५०</strong></p>
<p>महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मध्ये ३६ वर्षे कार्यरत. कक्ष अधिकारी म्हणून<br />
सेवानिवृत्त.</p>
<p>सकाळ , पुढारी इ. दैनिकातून तसेच<br />
मासिकांमधून कवितांना प्रसिध्दि मिळाली. आकाशवाणी सांगलीवर<br />
दोनदा काव्यवाचन झाले.</p>
<p>पहिला चारोळीसंग्रह <strong>"इंद्रधनू "</strong><br />
हा कविवर्य कुसुमाग्रजांना अर्पण केला आणि त्यांचे आशिर्वाद लाभलेला हा संग्रह १९९७ मध्ये प्रकाशित झाला.</p>
<p>त्यानंतर दुसरा चारोळीसंग्रह<br />
<strong>" रिमझिम " </strong>हा समग्र पाऊसकवितांचा संग्रह २००६<br />
साली प्रकाशित झाला</p>
<p>त्यानंतर<strong> " कवडसा " </strong>हा संकीर्ण<br />
८० कवितांचा संग्रह २०११ मध्ये प्रकाशित झाला</p>
<p>त्यानंतर</p>
<p><strong>१) सांग ना ग आई</strong></p>
<p><strong>२) काव्यपंचतंत्र</strong></p>
<p>हे दोन बालकवितासंग्रह २०१२<br />
मध्ये</p>
<p>तर <strong>" दर्पणी मनीच्या "</strong> हा ६ वा<br />
काव्यसंग्रह २०१५ मध्ये प्रकाशित झाला</p>
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा