<p><strong>सौ.जागृती सुधीर निखारे.</strong></p>
<p><strong>३१ ऑक्टोबर/ जन्मतारीख</strong></p>
<p>माझे तसे एकही पुस्तक मी प्रकाशित केलेले नाही.पण लेखन भरपूर केलेय.मासिके, दिवाळी अंक, वृत्तपत्रे, <br />
त्यातील काही नावं: वहिनी, चारचौघी, वृत्तझेप, साप्ताहिक सकाळ इ., तसेच लोकसत्ता, तरूण भारत, लोकमत इ., जवळ जवळ ४०० लेख प्रकाशित झाले आहेत.</p>
<p>श्रीमती नाथीबाई ठाकरसी दूरस्थ विद्यापीठात शिक्षण विभागात अध्यापिका म्हणून काम करतांना तेथील विद्यार्थिनींना ज्या नोटस् दिल्या जातात , त्यांना जी पुस्तके नेमली जातात त्यावर रिसर्च करून सविस्तर नोट्स लिहिल्या आहेत.बी.ए.पार्ट -१, टी.वाय.बी.ए.,एस .वाय. बी.ए. साठी.उदां आशा बगे यांचा 'मारवा' कथासंग्रहावर, मल्लीका अमरशेख ह्याच्या 'उध्वस्त व्हायचयं मला' या आत्मकथनावर आधारीत स्री- समस्याविषयक साहित्यावर, मराठी साहित्याचा ईतिहास १९२० ते१९६० मधील मराठी साहित्यप्रकार ह्यावर लिखाण केले आहे.</p>
<p>आकाशवाणी मुंबई येथे काही कार्यक्रम स्वतः लिहून सादर केले. त्यात काही पुस्तक परिक्षणे, चारचौघींच्या गप्पागोष्टी , प्रवीसातील गमतीजमती, २००१ सालाचे सुस्वागतम् अशा प्रकारच्या अनेक लेखन प्रकारांचे लेखन व सादरीकरण.<br />
एम्.फिल्.ला "विंदा करंदीकरांच्या 'आदिमाया काव्यसंग्रहात समाविष्ट कवितांमधील अँटीरोमँटीक अँटीट्युड" यावर प्रबंधिका. </p>
<p>बर्याच नाटकांमधून लग्नाआधी भूमिका, नंतर "वुमेन्स सोशल सर्विस कमिटी ,सेंट्रल रेल्वे "तील अनेक कार्यक्रमात सहभाग, "महिला विकास मंडळ ,कुलाबा "येथील सभासद असतांना अनेक कार्यक्रमात भाग( एकांकिका, भावगीत इ.)<br />
दूरदर्शनवर मुलाखती घेतल्यात.तसेच संगीतकार स्व.पूज्य कमलाकर भागवत, श्री.यशवंत देव, गायिका माणिक वर्मा अभिनेत्री सुलभा देशपांडे, वंदना गुप्ते, प्रशांत दामले , दिवंगत पूर्व पंतप्रधान व्ही.पी.सिंग अशा अनेक दिग्गजांच्या मुलाखती घेण्याचे सौभाग्य प्राप्त झाले.</p>
<p>© जागृती निखारे.जागृती निखारे. डबल एम.ए.(मराठी), एम्.फिल.बी.एड.पी.एच.डी.चा थिसिस आशा बगे ह्यांच्या कथांवर करत होते.३/४ थिसिस झाला.पण तब्येतीमुळे अडला.</p>
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा