'गुंतता हृदय हे...' हा कथासंग्रह,(विजय प्रकाशन ,नागपूर) 'चेरीचं झाड' हा ललित संग्रह व 'वेध अंतरंगाचा 'हा वैचारिक लेख संग्रह (दोन्ही साहित्य प्रसार केंद्र नागपूर द्वारे प्रकाशित व अमेझॉन वर विक्रीस उपलब्ध आहेत ) 'गुंतता हृदय हे' व 'वेध
अंतरंगाचा' या पुस्तकांना पद्मगंधा व रसिकराज संस्थेचे राज्यस्तरीय पुरस्कार मिळालेत .जानेवारी २०१८ला कथासंग्रह -'झिरो मॅरेज' प्रकाशित-अक्षता प्रकाशन ,पुणे. (झिरो मॅरेज बुकगंगा वर विक्रीस उपलब्ध आहे )व कविता संग्रह --'कुंजधून' ,साहित्य प्रसार केंद्र नागपूर . कथासंग्रह -'झिरो मॅरेज' ला 'वाङ्मय चर्चा मंडळ' ,बेळगाव ,'सूर्योदय सर्वसमावेशक मंडळ', जळगाव ,'सृजन साहित्य संघ',मूर्तिजापूर ,'अंकुर साहित्य संघ' अकोला ,'साहित्य कला मंच' ,पालघर उत्कृष्ट कथा संग्रह पुरस्कार (5) प्राप्त झालेले आहेत. 'ट्रोलधाड' कथासंग्रह -दत्तात्रेय सांडु प्रतिष्ठान चेंबूर मुंबई, शब्दांगण पुरस्कार चंद्रपूर, महामृत्युंजय पुरस्कार गडचिरोली, चक्रधर स्वामी पुरस्कार, हिंगोली, एकता फौंडेशन पुरस्कार,अहिल्यानगर, उज्जैनकर फौंडेशन पुरस्कार मुक्ताईनगर असे ६ पुरस्कार प्राप्त झालेले आहेत.
'जाणीव नेणीव' वैचारिक लेखसंग्रहाला अक्षरसागर कोल्हापूर व वाड्.मय परिषद बडोदे गुजरात पुरस्कार मिळाला आहे तर 'काळीजफूल' ललित लेखसंग्रहास मसाप सोलापूर, शिवाबाबा वाघ प्रतिष्ठान व सार्वजनिक वाचनालय कल्याणचा प्रथम पुरस्कार मिळालाय.
अखिल भारतीयस्तरीय व राज्यस्तरीय 46 साहित्य पुरस्कारांच्या त्या मानकरी आहेत. हे सर्व दर्जेदार पुरस्कार त्यांच्या कथा,कविता,ललित लेख,नाटक.व पुस्तकांना प्राप्त झालेले आहेत.विविध वृत्तपत्रं ,मासिकं,साप्ताहिकं ,दिवाळी अंकात लेखन ,स्तंभ लेखन केलंय. २००५ पासून नागपूर आकाशवाणीवर त्यांचे आजवर अनेक कार्यक्रम सादर झालेत. आकाशवाणी नागपूर, नागपूर दूरदर्शन, मुंबई दूरदर्शन सह्याद्री वाहिनी,साम टीव्ही, शंखनाद चॅनेल संवाद मिडिया मुंबई यावर तसेच मासिकांतून, दिवाळी अंकात त्यांच्या मुलाखती प्रसारित व प्रकाशित झालेल्या आहेत. अखिल भारतीय साहित्य संमेलने,विविध साहित्य संमेलने, चर्चासत्र ,परिसंवाद यात निमंत्रित वक्ता,कथाकार,कवी म्हणून सहभाग ,मुक्त पत्रकार व संपर्क अधिकारी ,प्रसिद्धी प्रमुख म्हणून काम .
आगामी --कथासंग्रह.
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा