नमस्कार !
मी वैभव नारायण जोशी अंबरनाथ येथे असतो . साधारण सहावित असताना पाहिली कविता लिहिली . यानंतर बरेच कविता कथा लिहिल्या व त्या हरवल्या ही ! पुढे 9वित असताना माझ्या हास्य कवितेस प्रथम क्रमांक मिळाला ! दुर्दैवाने याचे बक्षिस मिळालेच नाही ! दरम्यान लेखन काहिसे थांबले होते . मग 2012 ला फेसबूक ची ओळख झाली व तिथे काही साहित्य प्रसिध्द केले . येथेच प्रतिलिपिची ओळख झाली व काही साहित्य प्रसिद्ध झाले !
सुरवातीस या प्रतिलिपिवर अत्यंत गचाळ अनुभव आला ! वाचकवर्ग ताळतंत्र सोडुन चक्क शिवराळ कमेन्ट करू लागले ! याची तक्रार मी प्रतिलिपि संचालक मंडळास केली परंतू फारसा फरक पडला नाही . कंटाळून येथून मी साहित्य काढून घेतले . मधे प्रतिलिपित झालेले उत्तम बदल मला या प्रतिलिपिवर पुन्हा घेवून आले! अल्पावधित 3 लाख वाचकवर्ग मिळाला !
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा