pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

कबीरा उभा बाजारात

4.6
4272

-तो फकीर होता , कवी होता , संत होता , समाज सुधारक का कोणी अलमस्त जोगी ?एकाच माणसाचे बहुरंगी रूप आपण कबीरमध्ये बघतो . एका मागासवर्गीय विणकर जातीत जन्म घेतलेले कबीर कधीच शाळेत गेले नाही. शास्त्र पोथ्या ...

त्वरित वाचा
लेखकांविषयी
author
विश्वनाथ शिरढोणकर

विश्वनाथ शिरढोणकर १०१ , श्रीकृष्ण अपार्टमेंट , २८८ , लोकमान्य नगर , केशरबागरोड , इंदूर म.प्र. ४५२००९ फोन,०७३१-२३६८७०५ मो , ९१९८९३१२५२४७ इमेल- [email protected] मी 1963 साली हिंदीत लिखाण सुरु केले . त्या वेळेस इंदूरहून निघण्याऱ्या दैनिक ' नई दुनिया ' मध्ये बरेच लेख , कथा व कविता प्रसिध्द झाल्या . स्वत:च्या लेखानाव्यतिरिक्त त्या वेळेसचे मराठीचे नामवंत लेखक यदुनाथ थत्ते , राजा राजवाडे , वि. आ. बुआ ,इंद्रायणी सावकार , रमेश मंत्री यांच्या काही कथांचे / नाटकांचे हिंदीत केलेले अनुवादही प्रकाशित झाले . इंदूरहूनच निघणाऱ्या मध्य भारत हिंदी साहित्य समितेचे गाजलेले मासिक , ' वीणा ' मध्ये देखील कथांचे प्रकाशन.आग्रा येथून निघणाऱ्या ' नोकझोंक ' या हास्य मासिकात व इंदूरहून निघणाऱ्या ' आरती ' या मासिकात काही रचनांचे प्रकाशन झाले .इंदूरहून प्रकाशित नईदुनियाच्या दिवाळी विशेषांक , (दीपोत्सव २०११) मध्ये कथा प्रकाशित . आकाशवाणी इंदूर व भोपाळ आणि विविध भारतीच्या ' हवामहाल ' या कार्यक्रमात नाटकांचे प्रसारण . - हिंदी साहित्यानंतर मराठीकडे वळण झालं . इंदूरहून प्रकाशित , ' समाज चिंतन ' , ' श्री सर्वोत्तम ' च्या दिवाळी विशेषांकात ( २००५ ते २०१५ पर्यंत लगातार ) आणि इतर अंकातही आणि इंदूरहूनच प्रकाशित , ' मी मराठी ' साप्ताहिकात व लहानमुलांसाठी प्रकाशित देवपुत्र ( मराठी) त नियमित प्रकाशन . मुंबईहून प्रकाशित ' अक्षर संवेदना ' ( दिवाळी २०११ आणि दिवाळी २०१५ ) अंक आणि ' रंगश्रेयाली ' ( दिवाळी २०१२ , २०१३ व २०१४ ) च्या अंकात आणि पुणेहून प्रकाशित, 'साहित्य चपराक ( दिवाळी विशेषांक - २०१३ , व २०१४ व २०१५ ) व ' माझी वाहिनी ' व " सत्याग्रही " '"काव्यदीप " व कोल्हापूरहून प्रकाशित ' साहित्य सहयोग ' च्या (दीपावली २०१३ व २०१४ आणि २०१५ ) आणि मुंबई हून प्रकाशित ' लक्षवेध ' ( दिवाळी अंक २०१४ व २०१५ )इत्यादी अंकात कथा / कविता / लेख प्रकाशित . एकूण 50 कथा , ५० कविता आणि १५० हून अधिक ललित लेखांचे प्रकाशन .-पुस्तकांमध्ये मराठीत एक काव्य संग्रह , ' बिन चेहऱ्याचा माणूस खास ' चे २००७ मध्ये प्रकाशन . या काव्यसंग्रहाला महाराष्ट्र साहित्यासभा इंदूरच्या शारदोत्सव २००८ मध्ये प्रतिष्ठीत तात्या साहेब सरवटे पुरस्काराने पुरस्कृत करण्यात आले . एक पारिवारिक वंशावळ सं. न. वि.वि. चे प्रकाशन . एकाच विषयावर लिहिलेली कविता आणि त्याच विषयावर लिहिलेल्या कथांचा आगळा वेगळा संग्रह ,' कविता सांगे कथा ' चे २०१० मध्ये प्रकाशन .एक कथा संग्रह ,'व्यवस्थेचा ईश्वर ' आणि एक ललित लेख संग्रह , ' नेते पेरावे आणि नेते उगवावे ' चे वर्ष २०१२ मध्ये पुणे येथून प्रकाशन .' फेसबुकच्या सावलीत ' काव्यसंग्रहाचे विमोचन गेल्या २५ जानेवारी २०१४ ला बऱ्हाणपूर येथे मध्य प्रदेश प्रांतीय मराठी साहित्य संमेलनात झाले . श्री राजन खान यांचे प्रकाशन , अक्षर मानव प्रकाशन तर्फे ' विहान ' हा मराठी काव्य संग्रह २०१५ साली प्रकाशित . - बडोदे येथे ३१ जानेवारी २०१५ला मराठी वांग्मय परिषद बडोदेच्या साहित्य संमेलनाच्या , ''बृहन महाराष्ट्रातले साहित्यिक संचित या परिसंवादात सहभाग , इंदूर , इटारसी , आणि भोपाळ , ग्वाल्हेर येथे अनेक कथाकथन . "मी होतो - मी नव्हतो " ही मराठी कादंबरी , शुध्द भारतीय का कथा संग्रह आणि मराठीत एक काव्य संग्रह व हिंदीत एक काव्य संग्रह प्रकाशनच्या मार्गावर . -चंद्रपूर ( महाराष्ट्र ) येथे सम्पन झालेल्या ८५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात आमंत्रित कवी म्हणून सहभाग.

टिप्पण्या
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    kamalnath kamble
    30 मे 2019
    कबीर साहेबांचा एक दोहा मला फार आवडतो. ते म्हणतात की 'तेरा मेरा मनूवा कैसन एक होई, हो कहता आँखन की देखी, तू कहता कागज की लेखी. पूस्तकी पांडीत्यातून तू ईश्वराचे वर्णन करतो, मी ईश्वर प्रत्यक्ष पाहीला,अनूभवला आहे, तेव्हा तूझं, माझं कस जमेल. हे वाराणसीच्या त्या पंडीतांना उद्देशून केलेल होत ज्यांनी ईश्वरीअनूभव, शिक्षण, वाचन लेखन ही केवळ उच्चवर्णियांसाठीच असलेली बाब आहे,बहूजन, दलीत, सामान्यांचे हे काम नाही अशी धारना करून घेतली होती, येथे कबीर साहेब आणि तूकाराम महाराज ह्यांच्यात कमालीचे साम्य दिसते. भक्ती आंदोलनातून आलेला भक्ती मार्गाचा प्रचार प्रसार करून दोघांनीही नैतिकतेवर, प्रेमळ मानवतेवर आधारलेली समताधिष्टीत समाजव्यवस्था तमाम भारतीयांना दिली हे त्यांचे भारतीय जनमानसांवर थोर उपकारच आहेत. त्यांना त्रिवार वंदन, जयभीम.
  • author
    Pandit Sir
    08 सप्टेंबर 2017
    फार चांगलीव पण थोडक्यात कबिरांच्या जीवनाची कहाणी. अजून दोहे हवे होते.स
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    kamalnath kamble
    30 मे 2019
    कबीर साहेबांचा एक दोहा मला फार आवडतो. ते म्हणतात की 'तेरा मेरा मनूवा कैसन एक होई, हो कहता आँखन की देखी, तू कहता कागज की लेखी. पूस्तकी पांडीत्यातून तू ईश्वराचे वर्णन करतो, मी ईश्वर प्रत्यक्ष पाहीला,अनूभवला आहे, तेव्हा तूझं, माझं कस जमेल. हे वाराणसीच्या त्या पंडीतांना उद्देशून केलेल होत ज्यांनी ईश्वरीअनूभव, शिक्षण, वाचन लेखन ही केवळ उच्चवर्णियांसाठीच असलेली बाब आहे,बहूजन, दलीत, सामान्यांचे हे काम नाही अशी धारना करून घेतली होती, येथे कबीर साहेब आणि तूकाराम महाराज ह्यांच्यात कमालीचे साम्य दिसते. भक्ती आंदोलनातून आलेला भक्ती मार्गाचा प्रचार प्रसार करून दोघांनीही नैतिकतेवर, प्रेमळ मानवतेवर आधारलेली समताधिष्टीत समाजव्यवस्था तमाम भारतीयांना दिली हे त्यांचे भारतीय जनमानसांवर थोर उपकारच आहेत. त्यांना त्रिवार वंदन, जयभीम.
  • author
    Pandit Sir
    08 सप्टेंबर 2017
    फार चांगलीव पण थोडक्यात कबिरांच्या जीवनाची कहाणी. अजून दोहे हवे होते.स