मी शिक्षिका, लेखिका पत्रकार तसेच सामाजिक कार्यकर्ती आहे.माझी सहा पुस्तके प्रकाशित झाली आहेत.त्यातील चार बालसाहित्याचीअसून माझ्या आत्मनिर्धार हा पहिला कथासंग्रह साहित्य आणि संस्कृती मंडळ महाराष्ट्र मंडळ अनुदान प्राप्त व शासन यादीत समाविष्ट आहे.ओसाडगावचे रहिवासी नावाचे पुस्तक सामाजिक कार्यावर आधारित आहे.यात आपण कल्पना करू शकत नाही असे जीवन वास्तव रेखाटले आहे. विविध मासिके ,दिवाळी अंक ,वृत्तपत्र यांमधून माझे लेख व कथा प्रकाशित होत असतात . आकाशवाणी कथा तसेच सह्याद्री वाहिनीवर सखी सह्याद्री ह्या कार्यक्रमात मुलाखत अमरावती विद्यापीठात मुलाखत व अनेक ठिकाणी वक्ता म्हणून तर कुठे कथाकथनाकरीता असे अनेक मानाचे क्षण अनुभवत असते.लेखण करणे हा माझा छंद आहे.ही ईश्वरी देणगी आहे असे मी मानते.
'नोहे पदरीचि वाणी माझी,
बोलविता धनी वेगळाचि'.
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा